मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने घट पाहण्यास मिळत होती. नव्या बाधितांची रूग्णसंख्या रोडावल्यामुळे अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. याशिवाय मास्क सक्तीदेखील मागे घेण्यात आली आहे. परंतु, आता राज्याच्या चिंतेत काहीशी भर टाकणारी आकडेवारी गेल्या 24 तासात समोर आली असून, राज्यात 24 तासात 711 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या 24 तासामध्ये एकूण 366 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात 3475 सक्रिय रुग्णांची नोंद
दरम्यान, राज्यात आज एकूण 3475 इतक्या सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 2526 रुग्ण हे मुंबईमध्ये असून, या खालोखाल ठाण्यामध्ये 413 कोरोनाचे सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना गेल्या 24 तासाच राज्यात केवळ एका कोरोना बाधिताच्या मृत्युची नोंद करण्यात आली असून, राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 77,35, 751 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्क्यांवर नोंदवण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.