सांगली - ‘ऊस शेतीत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. ऊस शेतीप्रमाणे द्राक्ष शेतीतही एआय तंत्रज्ञान कसे वापरता येईल याची चर्चा झाली आहे. द्राक्ष शेतीतही या तंत्रज्ञानाला चालना देणार आहे,’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले..जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. १६) झालेल्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे उपस्थित होते.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेतला आहे. द्राक्षाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. डाळिंब, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असून निर्यात ही केली जाते..या बैठकीत रेसिड्यू लॅबची मागणी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केली आहे. यांसह जे नवीन प्रश्न चर्चेला आले, ते डिसेंबरच्या अधिवेशनात मार्गी लागतील. त्यासाठी तरतूदही करावी लागणार आहे. म्हैसाळ सिंचन योजनेच्या उर्वरित कामांसाठी निधीची तरतूद केली आहे.शक्तिपीठ महामार्गाबाबत मोजणी करू देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. पर्यायी मार्ग असताना शक्तिपीठ महामार्ग कशासाठी असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री व मंत्री यांच्याशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल..‘योग्य वेळी कर्जमाफी देऊ’‘आमच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा समावेश होता. हे आश्वासन आम्ही दिले आहे. आम्ही कर्जमाफी करणार नाही असे कधीच म्हटले नाही. त्यामुळे पाच वर्षांत योग्य वेळी कर्जमाफी करू,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.