
Heavy Rainfall Expected Across Maharashtra as Monsoon Retreats
मान्सूनचा परतीचा प्रवास १५ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानमधून अंदाजे १७ सप्टेंबरला सुरू होईल. विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आला आहे.