महात्मा गांधीजींचा चक्क अपघाती मृत्यू, 'या' सरकारचा प्रताप

gandhiji.jpg
gandhiji.jpg

भुवनेश्वर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरून आता नवीन वाद झाला आहे. या वादाला ओडिशा सरकार कारणीभूत ठरले आहे.  
गांधींजी यांचा मृत्यू हा एक ‘अपघात’ होता, असे राज्य सरकारच्या पुस्तकात म्हटल्याने हा नवा वाद उत्पन्न झाला आहे. 

याप्रकरणी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी माफी मागावी आणि ही चूक दुरुस्त करावी, अशी मागणी राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. 

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रकाशित पुस्तिका ‘आमा बापूजी : एका झलक’मध्ये त्यांचे कार्य, शिकवण आणि ओडिशाशी असलेले त्यांचे नाते याची माहिती देण्यात आली आहे. यात असा दावा करण्यात आला आहे की, दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये ३० जानेवारी १९४८ रोजी अचानक झालेल्या घटनाक्रमात गांधीजी यांचे आकस्मिक निधन झाले.

दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री नरसिंह मिश्रा म्हणाले की, चुकीच्या माहितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी. ही चूक ‘अक्षम्य कृती’ आहे. अनेकांनी याबाबत व्टिट करत निषेध केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com