

Manoj Jarange Patil
esakal
गेल्या १९ दिवसांपासून मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं. उपोषण सोडलं असलं तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. ३ महिन्यात गॅझेटियर लागू करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलीय. जर सरकारनं धोका दिला तर मुंबई गाठणार असा इशारासुद्धा जरांगे पाटील यांनी दिला आहे.