Maratha leader Manoj Jarange during Beed rally : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आज बीड येथील जाहीर सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. “सरकारच काय, सरकारचा बाप आला तरी मराठा आरक्षण मिळवणार, तेही ओबीसी कोट्यातूनच,” असा निर्धार व्यक्त करत त्यांनी ‘चलो मुंबई’चा नारा दिला. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.