
Maratha Reservation: गाडीवरच गणपती बसवणार आणि मुंबईच्या समु्द्रातच विसर्जन करणार!, अशी आक्रमक भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघालेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात जरांगेंचं वादळ मुंबईत धडकणार आहे. गणेश चतुर्थीला म्हणजेच २७ ऑगस्टला जरांगे जालन्यातली अंतरवाली सराटी गावातून निघणार आणि गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी २९ ऑगस्टला जरांगेंचं भगवं वादळ मुंबईत धडकणार. यंदा मुंबईला जाणार आणि ओबीसीमधून मराठा आरक्षण घेऊनच परत येणार. त्यामुळे 'आरक्षण मिळवल्याशिवाय परत फिरायचं नाही' असं आवाहनच जरांगेंनी आपल्या मराठा समाजबांधवांनाही केलंय.