अंकुशनगर (जि. जालना) - ‘आम्ही २९ ऑगस्टला मुंबईत धडकणार आणि ‘ओबीसी’मधून आरक्षण घेणार. विजयाचा गुलाल उधळून परतणार,’ असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मंगळवारी व्यक्त केला..ते म्हणाले, ‘सरकारला शेवटचे एकच सांगतोय की, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. त्यासाठीच आमचा संघर्ष सुरू आहे. २७ ऑगस्टला मुंबईत आंदोलन केले जाणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू आहे. या काळात गणेशोत्सव सुरू होत आहे..मराठे आपल्या वाहनांवर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करतील. मिरवणुकीने ते मुंबईला जातील. कार्यकर्ते मुंबईतील समुद्रामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करतील. काहीजण गावोगावी परतल्यावर विसर्जन करणार आहेत. सणवार पुढील वर्षीही करता येतील. आरक्षण आणि नोकरी गेल्यावर पुन्हा येणार नाही.’ आंदोलनातील एकालाही काठीने डिवचले तर मराठे आणि तुम्ही आहात, असा इशारा जरांगे यांनी दिला..‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसे सांगितले तसेच समोरची व्यक्ती बोलते. फडणवीस यांना मराठ्यांचा द्वेष असून त्यांना आरक्षण द्यायचे नाही,’ असा आरोपही त्यांनी केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.