छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून सुरू असलेली दुपारची गोवा आणि सायंकाळची हैदराबाद विमानसेवा १६ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पर्यटननगरी आणि उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराच्या अर्थचक्रावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रवासी तसेच पर्यटकांच्या संख्येत घट होण्याची भीती निर्माण झाली असून वाढते इंधनदर आणि वाढलेला संचालन खर्च ही यामागील प्रमुख कारणे असल्याची चर्चा सुरू आहे.