राज्यात खरीपाची 97 टक्के क्षेत्रावर पेरणी, जलाशयात 66 टक्के साठा 

residentional photo
residentional photo

मुंबई,  राज्यात आतापर्यंत 86.1 टक्के पाऊस झाला असून गेल्यावर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 78.3 टक्के पाऊस झाला होता. यंदा जलाशयांमधील साठा 66.1 टक्के झाला आहे. गेल्यावर्षी 64.95 टक्के साठा होता. तसेच खरीपाची 97 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. ही जरी परिस्थिती एकीकडे असली, तरीही 50 ते 75 टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस झालेल्या 7 जिल्ह्यात नाशिकसह नंदूरबार, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबादचा समावेश आहे. 

खरीपाचे ऊस वगळून सरासरी क्षेत्र 1 कोटी 40 लाख 69 हजार हेक्‍टर असून गेल्या महिन्याखेरपर्यंत 1 कोटी 35 लाख 90 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. तसेच ऊसासह 1 कोटी 49 लाख 74 हजार हेक्‍टरपैकी 1 कोटी 37 लाख 63 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. त्यात 32 लाख 71 हजार 105 हेक्‍टर क्षेत्र तृणधान्याचे, 20 लाख 52 हजार 641 हेक्‍टर कडधान्य आणि 41 लाख 64 हजार 444 हेक्‍टर तेलबियांचे आहे. 41लाख 02 हजार 207 हेक्‍टरवर कापूस आणि 1 लाख 72 हजार 333 हेक्‍टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली. 

बोंडअळी नियंत्रणाचा दावा 
भात व नाचणीची पुनर्लागवड अंतीम टप्प्यात आहे. पिके वाढीच्या ते फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहेत. कापसाची 26 जिल्ह्यातील 20 हजार 160 गावांमध्ये पेरणी झाली. काही भागात कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 4 लाख 20 हजार सापळे व 12 लाख 42 हजार ल्युअर्स उपलब्ध करुन दिलेत. मागील आठवड्यात 519 पैकी 366 गावातील बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. बोंडअळी नियंत्रणातंर्गत कीटकनाशकांसाठी 8 कोटींची, तर कीड व्यवस्थापनासाठी अतिरिक्त 17 कोटींची तरतूद केली. कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी स्वत: खरेदी केलेल्या कीटकनाशकांसाठी 50 टक्के अनुदान देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे खत व बियाण्यांची पुरेशी उपलब्धता असल्याचे सरकारने म्हटले आहे. 


ठळक नोंदी 
- 100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस झालेले जिल्हे ः ठाणे, रत्नागिरी, पालघर, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम आणि गडचिरोली 
- 75 ते 100 टक्के पावसाचे जिल्हे ः रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नगर, कोल्हापूर, जालना, लातूर, परभणी, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर 
- विभागनिहाय यंदाचा अन्‌ गेल्यावर्षीच्या जलसाठ्याची टक्केवारी ः कोकण-93.07-93.96, पुणे-87.28-85.34, नाशिक-63.21-71.71, अमरावती-54.16-26.37, नागपूर- 48.51-33.10, मराठवाडा-29.21-45.42 
- 27 ऑगस्ट 2018 अखेर 311 टॅंकर्सद्वारे 309 गावे आणि 322 वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 149 गावांना 158 टॅंकर्सद्वारे, तर जालना जिल्ह्यातील 18 गावे आणि 3 वाड्यांसाठी 24 टॅंकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत होता 
- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 25 ऑगस्ट 2018 अखेर 30 हजार 410 कामे सुरु होती. त्यावर 1 लाख 40 हजार 521 इतके मजूर उपस्थित होते. सुरु करण्याच्या टप्प्यावर 5 लाखापेक्षा अधिक कामे मंजूर असून त्यांची मजूर क्षमता 12 कोटींहून अधिक आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com