माझ्यात गुणवत्ता आहे, माझे वडील मंत्री आहेत यात माझा दोष काय?

माझ्यात गुणवत्ता आहे, माझे वडील मंत्री आहेत यात माझा दोष काय?

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची मुलगी आणि विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांची मुलगा अनुसुचित जातीच्या आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना परदेशातील उच्चशिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे लाभार्थी असल्याची बातमी येताच नवा वाद उफाळून आला. हा वाद सुरु झाल्यानंतर स्वतः श्रुती बडोले हिने आपण शिष्यवृत्ती नाकारत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच आपले वडील मंत्री आहेत, यात आपला काय दोष आहे, असा सवालही उपस्थित केला आहे.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागाने 2013 पासून तयार केली आहे. गेली अनेक वर्षे गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे.याच खात्याचे मंत्री राजकुमार बडोले यांची मुलगी श्रुती हिला 'ऍस्ट्रोनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्‍स' या विषयांमध्ये 'पीएचडी' करण्यासाठी ब्रिटनमधील मॅंचेस्टर विद्यापीठामध्ये तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यावरून बडोले हे राजकीय टीकेचे धनी बनले आहेत.

या वादावर श्रुती बडोले हिने शिष्यवृत्ती नाकारत असल्याचे पत्र माध्यमांना पाठवले आहे. पत्रात ती म्हणते.......

मी श्रुती राजकुमार बडोले आय आय टी मद्रास मधून मी शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी माझे वडील मंत्री नव्हते. युके च्या युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स मध्ये मी माझं एम एस्सी पूर्ण केलं. याठिकाणी मी गुणवत्तेनुसार माझा प्रवेश आणि शिक्षण झालं. विद्यापीठाने गुणवत्तेमुळे मला शिष्यवृत्ती दिली ( सरकारी नव्हे). अवकाश संशोधनात काम करायचं हे माझं स्वप्न होत त्यानुसार मी एक एक पायरी चढत गेले तीही गुणवत्तेनुसारच, त्यावेळी माझे वडील मंत्री नव्हते.

'अॅस्ट्रो फिजिक्स' या विषयात जगातल्या पहिल्या सव्वीस व्या विद्यापीठात माझी निवड झाली. ती गुणवत्तेनुसार. या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा हे मी ठरवलंय.  मी कर्ज काढुन शिक्षण घेणार नाही हे मी बाबांना आधीच सांगितलं. या पूर्वी भावाच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्जाचे हप्त्ते अजूनही सुरू आहेत.

मला यापूर्वी गुणवत्ते नुसार विदेशातल्या विद्यापीठांनी शिष्यवृत्ती दिलीय. पण पीएचडी साठी शिष्यवृत्ती ची या विद्यापीठात सवलत नाही. गुणवत्तेनुसार माझी निवड झाली आहे तर मी याच विद्यापीठात  प्रवेश घेणार म्हणून . मी राज्य सरकार कडे शिष्यवृत्ती साठी अर्ज केला. ( जगातल्या पहिल्या शंभर विद्यापीठ मध्ये प्रवेश मिळत असेल तर त्या विद्यार्थ्याला कुठलाही आर्थिक निकषांची अट नाही हा जीआर आहे )  तरी मंत्री मुलगी आहे यावर वाद होतील हे आधी वडिलांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे वडिलांनी या निवड प्रक्रियेपासून स्वतःला बाजूला केलं.

पीएचडी इन सायन्स यासाठी राज्य सरकार च्या शिष्यवृत्ती करीत तीन जागा आहेत. या तीन जगासाठी केवळ दोन अर्ज आलेत त्यात एक जागा अजूनही रिक्त आहे. या जागेसाठी अजूनही अर्ज आलेला नाही. तर मी कुणाला डावलून शिष्यवृत्ती मिळवली का? जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठात  प्रवेश घेताना आर्थीक निकष लागू नाहीत हा माझ्या शिक्षणापूर्वीच नियम आहे. यात मी पात्र असेल तर यात माझा दोष आहे का? माझं या पूर्वीच शिक्षण गुणवत्तेनुसार झालं आहे. आता वडिलांच्या मंत्री पदा मुळे माझी गुणवत्ता कमी झाली का?

कुणाचाही हक्क कधी डावलला नाही. आणि कधी डावलणार नाही. वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद होत असेल. आणि यामुळे माझी गुणवत्ता झाकोळली जाणार असेल तर मी शिष्यवृत्ती नाकारत आहे. पण मी शिकणार. अवकाश संशोधनात जाणारच. सावित्रीबाई आणि बाबासाहेबांचं शिक्षणासाठीच स्वप्न साकार करण्यासाठी .....
आपली
श्रुती राजकुमार बडोले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com