'शास्त्रज्ञ चांद्रयान मोहिम यशस्वी करतील, पण प्रधानसेवक तुम्ही...'

MNS.jpg
MNS.jpg

मुंबई : चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न भंग पावले असले तरी देशाला 100% विश्वास आहे आमचे वैज्ञानिक चंद्रायन मोहीम यशस्वी करतील, पण प्रधानसेवक देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढतील का?, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे.

चांद्रभूमीपासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लॅंडरचा पृथ्वीवरील केंद्राशी असलेला संपर्क तुटला. नियोजित वेळेनंतही तो प्रस्थापित होऊ शकला नाही. त्यामुळे भारताचे चांद्रभूमीवर सुखरूप उतरण्याचे स्वप्न भंग पावले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची मोहीम भारताने आखली होती. ही मोहीम यशस्वी झाली असती तर या भागात यान उतरविणारा भारत पहिलाच देश ठरला असता.

देशभरातून इस्त्रोच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. मोदी स्वतः इस्त्रोच्या मुख्यालयात उपस्थित होते. आज सकाळीही त्यांनी शास्त्रज्ञांना संबोधित करत त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रय़त्न केला. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शास्त्रज्ञ त्यांचे काम यशस्वी करतील, पण प्रधानसेवक देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढतील का, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com