मोदी सरकारची सरसकट खासगीकरणाची भूमिका चुकीची : पृथ्वीराज चव्हाण

खासगीकरणाचा निर्णय़ म्हणजे सरकारची दिवाळखोरीकडे वाटचाल आहे
पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाणSakal

कऱ्हाड : केंद्र सरकारने महावितरणचा खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्या विरोधात देशभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसह संघटनांनी संप सुरु केला आहे. त्यामुळे मोदी सरकारची सरसकट खासगीकरणाची भुमिका चुकीची आहे. त्यांनीतव्रीत त्याचा फेर विचार करावा, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. एका कार्यक्रमानंतर त्यानी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. चव्हाण म्हणाले, खासगीकरण होऊ नकोच आहे. त्यावर आम्हा साऱ्यांचे एकमत आहे. बँकाच्या राष्ट्रीयकरणातून सार्वजनिक क्षेत्रात मोठे उद्योग उभे राहिले. खासगीकरणाचे तोटे दिसत आहेत. त्यामुळे त्याला विरोध आहे. खासगीकरण निर्णयाला आमचा ठाम विरोधच राहिल. खासगीकरण करणे चुकीचे आहे. मग ते एसटी महामंडळाचे असो, वीज मंडळाचे असो अथवा जमिनी विकण्याचा निर्णयाचे असो त्यात झालेले सरसकट खासगीकरण चुकीचे आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक उपक्रमातील पाच हजार हेक्टर जमीन विकण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय़ म्हणजे सरकारची दिवाळखोरीकडे वाटचाल आहे. घरचे दागिने विकून जसे घर चालवले जाते तसाच मोदी सरकार प्रकार करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com