

Maharashtra Monsoon Update
ESakal
मुंबई : अरबी समुद्रातून वेगवान प्रवास करत मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. यामुळे सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. यामुळे हवामानात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे. परंतु काही दिवसानंतर पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती आहे.