महाराष्ट्राला दिलासा; दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून 2160 कोटी रुपयांची मदत

महाराष्ट्राला दिलासा; दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून 2160 कोटी रुपयांची मदत

मुंबई: महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून दिलासा देण्यात आला असून वाढता दुष्काळ पाहता राज्याला 2160 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ, केंद्र सरकारकडून आणखी 2160 कोटी रूपये मदतीपोटी प्राप्त झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली आहे.
 

महाराष्ट्रातील दुष्काळासाठी आतापर्यंत 4248.59 कोटी रूपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितली असून पंतप्रधान मोदींचे आभारही मानले आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने याआधी 4 हजार 714 कोटी 27 लाख रुपयांची मदत केली होती. महाराष्ट्रावरील दुष्काळाचं सावट हटवण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितली होती. त्याचा हा पहिला टप्पा होता. तर आता केंद्र सरकारकडून 2160 कोटी रुपयांची मदत देण्यात आली असल्याचे मुख्यमत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com