Most Clean Village in Maharashtra : राज्यातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार हे असं एक गाव आहे जिथं ८० लोक करोडपती आहेत. एवढेच नाही तर इथे एकही डास सापडत नाही. जर इथे एकही डास सापडला तर ४०० रूपये बक्षिस दिसं जातं.
हिवरे बाजार हे गाव कधीकाळी दुष्काळग्रस्त होतं. पण इथल्या लोकांनी स्वतःच्या मेहनतीने या गावाचा सगळा चेहरामोहराच बदलून टाकला. या गावात ३०५ कुटुंब राहतात. ज्यापैकी ८० लोक करोडपती आहेत. १९९० च्या काळात हिवरे बाजारचे ९० टक्के लोक गरिब होते. पण आता या गावाचं भाग्य बदललं आहे.
जाणून घ्या कहाणी
हे गाव ८०-९० च्या दशकात दुष्काळग्रस्त होतं. प्यायलाही पाणी नव्हतं. काही लोक तर कुटुंबासहित गाव सोडून निघून गेले होते. पण तरीही गावातल्या लोकांनी आशा सोडली नाही. गावाला वाचवण्यासाठी पदर खोचला आणि कामाला लागले. १९९०मध्ये गावकऱ्यांनी जॉइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी बनवली. याअंतर्गत गावात विहिरी खोदणे, झाडी लावणे, श्रमदानाला सुरूवात झाली. याकामासाठी महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम अंतर्गत फंड मिळाला. यासाठी गावातल्या लोकांनी खूप मदत केली.
'या' पिकांना बंदी झाली
पाणी वाचवण्यासाठी गावातल्या लोकांनी काही पिकांना बंदी केली. ज्या पिकांना पाणी जास्त लागतं ती पिकं बंद केली. गावकऱ्यांच्या प्रयत्नाने आता या गावाचा जलस्तर ३०-३५ फूटापर्य़ंत आला आहे. गावातल्या बोअर विहिरी संपल्या आहेत.
पाणी वाचवण्यासाठी केले हे उपाय
आधी या गावात ऊस आणि ज्वारीचं पिक घेतलं जात होतं. पण यावर बंदी केल्यावर बटाटा आणि कांद्याची शेती केली जात आहे. यामुळे या लोकांना बराच पैसा मिळत आहे. इथले लोक आता पावसाची वाट पाहत नाहीत तर कमी पाण्यावर उगणारी पिकं घेतात.
या गावात ३०५ कुटुंब आहेत. ज्यात १२५० लोक आहेत. यापैकी ८० लोकं करोडपती आहेत. ५० पेक्षा जास्त कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न १० लाखापेक्षा जास्त आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.