

Dr. Jyoti Waghmare Highlights Impact of Phule Couple’s Thoughts
sakal
सावित्रीमाई आणि ज्योतिराव फुले यांच्या विचारांमुळे शिक्षणाबाबतची जाणीव शालेय जीवनातच मनात घर करून बसली. इंग्रजी साहित्यात पीएच.डी. करताना ‘पोस्ट-कोलोनियल’ स्टडीजच्या माध्यमातून अस्मितेचा शोध घेत असताना प्रत्येक पानावर महात्मा फुलेंचे ‘गुलामगिरी’ आठवत होते. शिक्षणाची दृष्टी केवळ पदवीपुरती नसून, अन्यायाविरुद्ध डोळस होण्यासाठी असावी, ही जाणीव झाली. ‘विद्येविना मती गेली’ हा ज्योतिबांचा विचार माझ्या जगण्याचा पाया ठरला.