

Mumbai-Goa Highway Traffic
ESakal
महेंद्र दुस्सार
मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. यामुळे अनेक सखोल भागात पाणी साचत असून रस्ते जलमय होत आहेत. परिणामी रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अशातच आता मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.