Mumbai University Election : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांना सरकारने स्थगिती दिली आहे. या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गटाने मोठी तयारी केली होती. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या निवडणुकीसाठी थेट मैदानात उतरले होते.
युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मुंबई विद्यापीठ निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज युवासेनेने १० जागेवर अर्ज दाखल केले. युवा सेनेचं पॅनल उभ केलं. गेल्या वेळी आम्ही १० जागा जिंकलो आणि आताही जिंकू. परंतु निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे.
सरदेसाई पुढे बोलले की, आमच्याकडे १० अर्ज फी सकट भरलेले आहेत. निवडणुका येत्या १० तारखेला होतील ही अपेक्षा आहे. काल रात्री परिपत्रक काढलं आणि आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले.
विद्यापीठ कमी पण हाय सेक्युरिटी सेंटर जास्त वाटत आहे. आम्हांला लक्षात आले की, आशिष शेलार यांनी एक पत्र दिले आणि निवडणुका थांबवल्या. काही नावांच्या दुबार नोंदणीचं हे पत्र असल्याचं वरुण यांनी सांगितलं.
काय म्हणाले सरदेसाई?
मला वाटतं हा विषय आता शासन आणि विद्यापीठाचा आहे. अनेक संघटना या निवडणुकांसाठी इच्छूक आहेत. प्रचंड गोंधळ कालच्या पत्रकामुळे झालेला आहे. येत्या १० दिवसांत निवडणुका होतील, अशी खात्री आहे आणि नाही झाल्या तर कुलगुरुंनी पीसी घेऊन स्पष्टता द्यावी.
दरम्यान, अमित ठाकरे यांचीही ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचीही कसोटी लागणार होती. मात्र, विद्यापीठाने निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थी संघटनेत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजप-शिंदे गटातील तयारी अपूरी पडल्यामुळे हा निर्णय झाला का? अशी चर्चा रंगली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.