

Mumbai Vijaydurg Ro Ro Service
ESakal
मुंबई : पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकणवासीयांचा प्रवास अधिकच सुकर आणि आरामदायी करण्यासाठी रोरो बोट सेवा सुरु केली. सागरी मार्गाने जलद प्रवास करता येणारी ही सेवा १ मार्च २०२६ पासून सुरु करण्यात आली होती. या फेरीमुळे अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबईहून विजयदुर्ग येथे पोहोचणे शक्य होत होते. प्रवास सुसाट असला तरीही या फेरीचे तिकीट दर परवडणारे नसल्याची माहिती समोर आली होती. यामुळे कोकणवासीयांसाठी सुरु करण्यात आलेली ही रोरो फेरी सेवा चर्चेत होती.