

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. संध्याकाळी नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून दोन्ही गट आमनेसामने आले. काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली. दगडफेकीची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या काळात दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीमुळे आणि जाळपोळीमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले. सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे.