Narayan Rane: ''...तर 'मातोश्री'चा एक भाग राज ठाकरेंना द्या'', नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde original Shiv Sena: बाळासाहेब ठाकरे यांनी ४८ वर्षांत जे काही मिळवले, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत संपवले, अशी टीका करत राणे यांनी शिवसेनेच्या सद्यस्थितीवर बोट ठेवले.
Narayan Rane
Narayan Raneesakal
Updated on

नागपूर: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मुंबईतून मराठी माणूस कुठे गेला आणि त्याला कोण जबाबदार आहे, असा सवाल करत मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी काम करणारा पक्ष आता अशा अवस्थेत का आला, याचे उत्तर मिळाले पाहिजे, असे राणे म्हणाले.

''उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही''

राणे म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मराठी माणसासाठी नेमके काय केले? आता मराठी भाषेवरून आनंदोत्सव साजरा करत आहेत. उद्धव ठाकरेंना मराठीवर आणि हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही." मराठी तरुणांसाठी उद्धव ठाकरेंनी काहीही केलं नाही, असं म्हणत राणेंनी जोरदार टीकास्र सोडलं.

Narayan Rane
Baba Vanga Prediction 2025: 'ती' वेळ खरंच आली? बाबा वेंगाची जुलै महिन्याची भविष्यवाणी; ग्रहांचे भयंकर संकेत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com