‘जिल्हा बँक जिंकली म्हणजे सत्ताच जिंकली असे त्यांना वाटते’

१८ कोटींच्या डीलचे काय झाले, आम्ही दिलेल्या तक्रारीचे काय झाले
Nawab Malik
Nawab Maliksakal media

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक (Sindhudurg District Bank Election) भाजपने जिंकली. या निवडणुकीत नारायण राणे गटाने दणदणी विजय मिळवला. जिल्हा बँक जिंकली म्हणजे महाराष्ट्राची सत्ता जिंकली असे काहींना वाटत आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी लगावला.

भाजपने जिल्हा बँकेच्या मतदारांचे (Sindhudurg District Bank Election) अपहरण करीत निवडणूक जिंकली. ते कोण अजित पवार म्हणता. मात्र, अख्खा महाराष्ट्राला अजित पवार (Aji pawar) कोण आहेत हे माहीत आहेत. फर्जीवाडा विरोधात लढाई सुरू ठेवण्याचा संकल्प नव्या वर्षात केला आहे, असेही नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले.

Nawab Malik
‘भाजपचेच लोक नियम पाळत नाही, पंतप्रधानांचे ऐकत नाही’

१८ कोटींच्या डीलचे काय झाले, आम्ही दिलेल्या तक्रारीचे काय झाले. रिया चक्रवर्तीबाबत कोर्टात धाव घेतली जात आहे. वसुली गॅंगला हात लावले जात नाही. अधिकाऱ्यांचा बचाव केला जात आहे. बँका डुबवणे, मंदिराच्या जागा विकणे असे सगळे फर्जीवाडे बाहेर आणणार आहे. ज्यांनी फर्जीवाडा केला त्यांच्यावर कारवाई होईल. राजकीय नेते, अधिकाऱ्यांविरोधात लढा देईल, असेही नवाब मलिक म्हणाले.

वैष्णोदेवी मंदिरामध्ये भाविकांची चेंगराचेंगरी झाली. यात १२ लोकांचा जीव गेला तर अनेकजण जखमी झाले. जबाबदारी निश्चित करून कारवाई करायला हवी, असेही ते म्हणाले. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, कोरोना नियम पाळत आंदोलन करायला हवी, असेही नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com