नक्षल कनेक्शन : पाच जणांची नजरकैद बुधवारपर्यंत

नक्षल कनेक्शन : पाच जणांची नजरकैद बुधवारपर्यंत

मुंबई- नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या कवी वरवरा राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा या पाच विचारवंतांच्या अटकेविरोधात दाखल झालेल्या याचिकांची पुढील सुनावणी 19 सप्टेंबर रोजी होणार आहे.

याबाबत, केंद्र सरकारने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, याबाबत न्यायालयाने दखलच घ्यायला नको. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुरावे सादर करण्याची तयारी दाखवली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. पाचही आरोपींच्या नजरकैदेत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

पुण्यात आयोजित केल्या गेलेल्या एल्गार परिषदेच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली कायदा आणि विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

आज (ता.17) या याचिकेवर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर या प्रकरणात हस्तक्षेप करता येणार की नाही, याबाबत बुधवारी ठरवू, असे न्यायालयाने सांगितले. म्हणून या प्रकरणाची पुढील सुनावणी आता बुधवारी (ता. 19) सप्टेंबर रोजी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com