राज्यातील दुष्काळावर राष्ट्रवादी आक्रमक

NCP
NCP

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे राज्यातील मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील दुष्काळाच्या प्रश्‍नावरून आक्रमक झाला आहे. दुष्काळाच्या गंभीर प्रश्‍नावर आवाज उठवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची ग्रामीण भागात तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा झाल्यावर लगेचच राज्यातील दुष्काळी भागाला भेट दिली. त्यानंतर मुंबईत दुष्काळ परिषद घेऊन पक्षाच्या प्रत्येक जिल्ह्यातील नेत्यांना बोलावून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची दिवसभराची बैठक घेऊन पवार यांनी त्या त्या भागातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या सूचना केल्या. पवार यांनी सर्वप्रथम राज्यातील दुष्काळाबाबत आवाज उठवत याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. पवारांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळाची बैठक बोलावून पावले उचलावी लागली. 

दुष्काळ आणि पाणीटंचाई याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्‍यात राष्ट्रवादी युवती, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते संपर्क दौरे करणार आहेत. ते ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणी समजावून घेणार आहेत. त्याचबरोबर सरकारच्या विरोधात जनमत तयार करून त्याचा लाभ आगामी विधानसभा निवडणुकीत करून घेण्याचा राष्ट्रवादीचा मनसुबा असल्याचे मानले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com