const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();

Adv Ujjwal Nikam : 'पक्षाचा व्हीप काढण्याचा अधिकार जयंत पाटलांनाच, गटनेत्यालाच आपल्याकडं वळवण्याची रणनीती'

'राष्ट्रवादी काँग्रेस हा अधिकृत पक्ष, ज्याची केंद्रीय निवडणूक आयोगाकडं झालीये नोंदणी'
NCP Crisis Jayant Patil Adv Ujjwal Nikam
NCP Crisis Jayant Patil Adv Ujjwal Nikamesakal
Summary

'विधीमंडळात जो राजकीय पक्षाने काढलेल्या आदेशाचा भंग झाला असेल, तर त्यावर पक्षाच्या प्रतोदाला कारवाई करता येते.'

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) असून त्यांनी विधीमंडळात गटनेते म्हणून जयंत पाटील यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळं जयंत पाटील (Jayant Patil) यांचा आदेश महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत त्यांना आपल्याकडं वळविणे ही व्यूहरचना असू शकते, असं मत ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. उज्वल निकम यांनी व्यक्त केलं.

अॅड. निकम (Ujjwal Nikam) म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधिमंडळात फूट पडली आहे. त्यामुळं त्यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. विधीमंडळात अधिकृत प्रतोद नियुक्त करण्याचा अधिकार राजकीय पक्षाच्या प्रमुखाला असतो. घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार हा अधिकार त्या पक्षाच्या अध्यक्षाला असतो.

NCP Crisis Jayant Patil Adv Ujjwal Nikam
NCP Crisis : 15 ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचा मोठा गट अजितदादांसोबत जाणार? जयंत पाटलांचंही नाव चर्चेत

राजकीय सत्तासंघर्षाच्या निकालातही ही बाब सर्वोच्च न्यायालयानं उघड केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा अधिकृत पक्ष, ज्याची केंद्रीय निवडणूक आयोगाकडं नोंदणी झाली आहे, त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यांनी अधिकृतरीत्या गटनेते म्हणून जयंत पाटलांची निवड केली आहे.

NCP Crisis Jayant Patil Adv Ujjwal Nikam
Loksabha Election : लोकसभा जवळ येताच पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसकडून मोठा बदल; 'या' नेत्यांना दिली महत्वाची जबाबदारी

पक्षाचा व्हीप काढण्याचा अधिकार हा पक्षाच्या निवडलेल्या प्रतोदला आहे. त्यामुळं जयंत पाटलांचा आदेश किंवा व्हीप हा महत्त्वाचा आहे. पक्षाचा व्हीप जयंत पाटील यांचाच लागू होणार आहे. त्यामुळं एखाद्याला आपल्याकडं वळविणे ही राजकीय पक्षाची व्यूहरचना असू शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

NCP Crisis Jayant Patil Adv Ujjwal Nikam
Loksabha Election : मंत्रीपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसचा 'हा' बडा नेता निवडणूक लढवणार? जारकीहोळी म्हणाले, हायकमांडनं मला..

प्रतोदाला कारवाईचे अधिकार

विधीमंडळात जो राजकीय पक्षाने काढलेल्या आदेशाचा भंग झाला असेल, तर त्यावर पक्षाच्या प्रतोदाला कारवाई करता येते. उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील यांची मैत्री पूर्वीच्या राजकीय पक्षात जरी असली, तरी जयंत पाटील यांनी जो आदेश दिला आणि त्यांचा भंग केला असेल, तर त्यावर कारवाई होवू शकते. परंतु, आज त्यावर भाकीत करणे कठीण आहे, असे मतही उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com