मुख्यमंत्री, जल्लोष कशासाठी करायचा ते सांगा..! : अजित पवार

Ajit Pawar
Ajit Pawar

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सरकारमधील मंत्र्यांकडून वेगवेगळी वक्तव्ये करण्यात येत आहेत. जोपर्यंत सभागृहात अहवाल मांडण्यात येत नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही. मराठा समाजात आजही संभ्रमावस्था आहे. मुख्यमंत्री म्हणतात जल्लोष करा, अहो पण जल्लोष करण्याआधी तो कशासाठी करायचा ते तरी कळू द्या, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून, अधिवेशनाचे कामकाज सुरु होताच आरक्षणाच्या अहवालावरून विधानसभेत चर्चा झाली. यावेळी मराठा आणि धनगर आरक्षणाचा अहवाल सभागृहात मांडण्यावरून गदारोळ पाहायला मिळाला. यामुळे सभागृहाचे कामकाजही तहकूूब करावे लागले.

अजित पवार म्हणाले, की मराठा समाजात आजही संभ्रमावस्था आहे. सरकारकडून वेगवेगळी वक्तव्य करण्यात येत आहेत. सरकारने मराठा आरक्षणाचा अहवाल स्वीकारला नाही, शिफारशी स्वीकारल्या अशी माहिती समोर येते. आम्ही पण सत्तेत होतो, कुठलाही अहवाल आल्यावर तो काय आहे तो समोर मांडला जातो. धनगरांच्या अहवालाचे काय झाले हे कळत नाही. ऍक्शन टेकन रिपोर्ट (ATR) मांडला जातो. चंद्रकांत दादांनी आरक्षण न्यायालयात टिकावे असे साकडे पांडुरंगाला घातलं, पण साकडं कशासाठी घातलंय ते लोकांना कळू द्या. मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष असतांना बारामतीला असताना माझ्या मतदार संघात येऊन म्हणाले पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगरांना आरक्षण देतो, पण ते दिले नाही

सर्व कामकाज बाजूला ठेवून मुंबईत मोर्चा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा व्हावी. मराठा आरक्षणाचा अहवाल आणि त्यावर सुरू असलेल्या करवाईवरची माहिती सभागृहात मांडावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com