Jitendra Awhad : मी तुकडे टाकल्यावर राजकीय कुत्रे भू भू करतात - कालिचरण महाराज

धर्म आणि देशासाठी काम करताना आम्ही कोणत्याही स्तरावर जायला तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSakal

कालिचरण महाराज यांनी नुकतंच महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानावरुन वातावरण तापलेलं आहे. त्यातच आता आणखी एका विधानाची भर पडली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर आता कालिचरण महाराजांनी निशाणा साधला आहे.

मी तुकडे टाकल्यावर राजकीय कुत्रे भू भू करतात, असं विधान करत त्यांनी आव्हाडांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

Jitendra Awhad
Maharashtra Politics : शिंदेंच्या काही मंत्र्यांना सावरकरांची विचारधारा पटत नाही का? सोशल मीडियावर चर्चा

काय आहे प्रकरण?

कालिचरण महाराजांनी काही दिवसांपूर्वीच महात्मा गांधी यांच्या हत्येच्या समर्थनार्थ विधान केलं होतं. नथुराम गोडसेने महात्मा गांधींबाबत जे केलं ते अगदी योग्य केलं. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता, गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम. नथुराम गोडसेंना तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुम्ही त्यांचे भक्त व्हाल, असं विधान कालिचरण महाराजांनी केलं होतं.

Jitendra Awhad
High Court : कोणतीही महिला सहसा बलात्काराबद्दल कथा रचत नाही; उच्च न्यायालयाचं मत

त्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. कालिचरणची लायकी काय? त्याचं शिक्षण काय? नथुराम गोडसे देशातला पहिला अतिरेकी आहे. महात्मा गांधींबद्दल बोलणारा कालिचरण कोण? असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतानाच कालिचरण महाराजांनी ही टीका केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com