Sunil Tatkare : खातेवाटपाला वेळ का? भुजबळ, वळसे-पाटलांना का डावललं? सुनील तटकरेंनी दिली उत्तरं

Sunil Tatkare : नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला तरी अद्याप खातेवाटप झालेलं नाही. तर भुजबळ, वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी उत्तरं दिली आहेत.
सुनील तटकरे
सुनील तटकरेEsakal
Updated on

राज्यात बहुमत मिळाल्यानंतरही भाजप महायुतीला सरकार स्थापनेला ११ दिवस लागले. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या शपथविधीला तीन आठवड्यांचा कालावधी लागला. आता मंत्र्यांचा शपथविधी झाला असला तरी ते बिनखात्याचे मंत्री आहेत. यातच मंत्रिपद डावललेल्या नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाला झालेला उशीर आणि वरिष्ठांना डावलल्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी साम टीव्हीशी बोलताना खुलासा केलाय.

सुनील तटकरे
Chhagan Bhujbal : मी तुमचाच आवाज, विचाराने निर्णय घेईन! माजी मंत्री भुजबळ यांची कार्यकर्त्यांना ग्वाही
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com