मुंबई : NCB चे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांना प्रकाशझोतात रहायला आणि माध्यमात चर्चेत यायला आवडतं. त्यासाठी वानखेडेंनी अनेक निर्दोष लोकांना एनडीपीएस गुन्ह्यात अडकवलं आहे. खोट्या केसेससाठी त्यांनी वेगळी टीमही तयार केल्याचा खळबळजनक आरोप नवाब मलिक (NCP Nawab Malik) यांना पाठवलेल्या पत्रात करण्यात आला आहे.
समीर वानखेडे खोट्या केसेस बनवत आहेत
एखाद्याच्या घरात कमी प्रमाणात ड्रग्ज सापडलं तर त्याचे प्रमाण वाढवून सांगण्यात येतं. जामीन मिळू नये यासाठी सापडेल्या ड्रग्जचे प्रमाण हे कमर्शियल किंवा इंटरमिजिएट असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे संबंधित व्यक्तीला जामीन मिळत नाही. नकली पंचनामे तयार करण्यात येतात. त्या पंचनाम्यामध्ये त्यांना हवं तसं लिहिलं जातं. वानखेडे त्यांच्या खबऱ्यांकडून ड्रग्ज खरेदी करवून खोट्या केसेस बनवत आहेत असा खळबळजनक आरोप या पत्रात केला आहे. खोटी टीम तयार करतात. त्यानंतर कमी प्रमाणात ड्रग्ज सापडल्यास त्याचे प्रमाण जास्त दाखवून ते कमर्शियल असल्याचं भासवतात आणि जामिन मिळू नये अशी मागणी करतात
26 वेगवेगळ्या केसेसबाबतची माहिती
नवाब मलिक यांनी आज एक पत्रकार परिषद घेत आणखी काही खुलासे केले आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी एनसीबीच्या एका अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र आल्याचं म्हटलंय. या पत्रात 26 वेगवेगळ्या केसेसबाबतची माहिती आहेत. अशा केसेस ज्यामध्ये लोकांना मुद्दाम अडकवण्यात आलंय अथवा फसवण्यात आलंय. नवाब मलिकांनी हे पत्र ट्विट केलं आहे.
मलिकांनी म्हटलंय की, मी खुलासे केल्यावर माझ्यावरच आरोप करण्यात आले. मात्र, मी हिंदू-मुस्मि करत हा मुद्दा पुढे नेत नाहीये. शाहरुख खान, समीर वानखेडे आणि नवाब मलिक असे मुसलमान या लढाईत उतरलेत, असा भाजप आरोप करतंय. मात्र मी आजवर कधीच धर्माचं राजकारण केलं नाहीये. कालचा मुद्दा धर्माचा नव्हता तर खोट्या जन्मदाखला सादर करुन नोकरी प्राप्त करण्याचा आहे.
पुढे ते म्हणाले की, काल जन्मदाखला शेअर केल्यावर मोठा गजहब झाला. मी दिलेल्या माहितीवर मी ठाम आहे. जो व्यक्ती खोटा दाखला दाखल करुन मागासवर्गीय जागेवरुन नोकरी प्राप्त करतो, त्याच्यावर माझा आरोप आहे. आमची लढाई एनसीबीबरोबर नाही. मी कधीही धर्माचं राजकारण केलेलं नाहीये. जो जन्मदाखला आम्ही ट्विट केलाय तो खरा आहे. दाऊद वानखेडे हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. त्यावर खाडाखोड करुन छेडछाड करण्यात आली आहे. आम्ही दिड महिन्यापासून हे कागद शोधत होतो. त्यानंतर हा कागद सापडला आहे. ज्ञानेश्वर वानखेडे जन्मापासून दलित आहेत. त्यांनी त्या आधारे नोकरी केली. नंतर ते मुसलमान झाले. समीर वानखेडेंनी वडिलांच्या सर्टीफिकेटचा आधार घेत स्वत:चं सर्टीफिकेट बनवलं. गरिब मागासवर्गीयाची जागा अडवली असून गैरफायदा घेतला आहे. या प्रमाणपत्रावर व्हॅलिडीटी कमिटीकडून चौकशी होईल. कायद्यानुसार नक्कीच कारवाई होईल.
अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र
नवाब मलिकांनी म्हटलंय की, ट्विटरवर एक पत्र मी पोस्ट केलंय. एनसीबीतील एका अधिकाऱ्याने मला पाठवलंय. दोन दिवसाआधी मला ते मिळालंय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना देखील ते मी दिलंय. यामध्ये 26 केसेसचा उल्लेख केला गेलाय. कशाप्रकारे पैसे वसूल केली जाते, कशाप्रकारे चुकीची कामे केली जाते, याचा उल्लेख त्या पत्रात आहे. एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून हे पत्र मला प्राप्त झालं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.