भाजपला वगळून महाराष्ट्रात कोणतंही सरकार टिकणार नाही : सुभाष देशमुख 

shubhash.jpg
shubhash.jpg
Updated on

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल येऊन महिना होत आला आहे, मात्र अद्यापही महाराष्ट्रात कोणीही सरकार स्थापन करु शकलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात अस्थिरता असल्याचे चित्र आहे.  

दरम्यान, सध्या महाशिवआघाडीची चर्चा जोर धरत असताना, 
महाराष्ट्रामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपला वगळून महाराष्ट्रातील कोणतंही सरकार टिकणार नाही असं दावा, महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे. 

भाजपने सध्या 'वेट अँड वॉच' ची भूमिका जरी घेतली असली तरी येणाऱ्या काळात सत्तेची चक्र कोणत्या बाजूने फिरतील याचा अंदाज घेणं तूर्तास तरी शक्य नाही. सध्या मात्र महाशिवआघाडीचे सरकार स्थापन कऱण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीमध्ये याबाबत बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com