जिल्ह्यातील ‘या’ २७४ गावांमध्ये ५० टक्के सुद्धा मतदान नाही! प्रांताधिकारी, तहसीलदार, बीडीओ देणार भेटी; मतदानावर बहिष्कार घातलेल्या गावांचेही सुटणार प्रश्न

मागील लोकसभा निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या २७४ मतदान केंद्रांवर विशेषत: गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर उपाय काढला जाणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रांताधिकारी, तहसीलदार, बीडीओ, नायब तहसीलदार त्या गावांना भेटी देतील.
Vote India
Vote IndiaSakal

सोलापूर : मागील लोकसभा निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या २७४ मतदान केंद्रांवर विशेषत: गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर उपाय काढला जाणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी (बीडीओ), नायब तहसीलदार त्या गावांना भेटी देतील. दुसरीकडे मतदानावर बहिष्कार घालणाऱ्या गावांचीही यादी मागविण्यात आली असून त्या गावांमध्येही वरिष्ठ अधिकारी जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर व माढा मतदारसंघातील २७४ मतदान केंद्रांवरील मतदानाची टक्केवारी अन्य केंद्रांच्या तुलनेत खूपच कमी होती. एकूण मतदारांच्या सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांची यादी जिल्हा प्रशासनाने तयार केली आहे. शहर उत्तर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, करमाळा व बार्शी या तालुक्यातील सर्वाधिक केंद्रे आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच मतदान केंद्रांवर किमान ६८ ते ७० टक्के तरी मतदान व्हावे, यासाठी अधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे.

निवडणुकीवेळी त्या गावातील मतदान नेमके कोठे जातात, मतदानाला का येत नाहीत, त्यामागील कारणांचा शोध घेऊन वरिष्ठ अधिकारी आता त्यावर तोडगा काढणार आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला मतदानाचा अधिकार असून त्यांच्या मतांमधून राज्याचा, देशाचा नेता (पंतप्रधान, मुख्यमंत्री) ठरतो. त्यामुळे सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

३५ ते ४० टक्के लोक मतदान करत नाहीत

सोलापूर जिल्ह्यात सोलापूर व माढा या दोन लोकसभेच्या जागा आहेत. जिल्ह्यात एकूण ३५ लाख ७८ हजार ९७२ मतदार आहेत. मात्र, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर ३३ ते ५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्कच बजावला नसल्याची बाब समोर आली. पाच वर्षांतून एकदा निवडणूक येते, तरीदेखील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्थानिक निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा व लोकसभा निवडणुकीवेळीच मतदानाची टक्केवारी कमी का राहते, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. त्यामुळे आता मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या केंद्रांना आता अधिकारी भेटी देऊन त्या कारणांचा शोध घेणार आहेत.

मतदान टक्केवारी कमी असलेली केंद्रे

  • सोलापूर लोकसभा मतदारसंघ ः मोहोळ (३), शहर उत्तर (१०), शहर मध्य (७१), अक्कलकोट (५४), दक्षिण सोलापूर (६८), पंढरपूर (२६).

  • माढा लोकसभा मतदारसंघ : करमाळा (१५), सांगोला (८), माळशिरस (६), माढा (१).

  • धाराशीव लोकसभा मतदारसंघ : बार्शी (१२).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com