मुंबई - प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर २०२० या कालावधीसाठी अख्ख्या चण्याऐवजी प्रतिमहिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यात अख्ख्या चण्याऐवजी डाळ घेण्यास अधिक पसंती असल्याचे निदर्शनास आले असून, अनेक लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात विनंती केल्याने हा निर्णय आज घेण्यात आला. या चणा डाळ वितरण योजनेसाठी एकूण ७३ कोटी ३७ लाख एवढा आर्थिक भार पडणार आहे.
तसेच शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी एक हजार ५०० कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रिमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
अन्य निर्णय
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.