
OBC leaders Atul Save and Parinay Fuke assure that reservation will not be affected as Babanrao Taywade ends hunger strike by drinking water.
esakal
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे मंत्री अतुल सावे यांनी आश्वासन दिले आणि १२ मागण्या मान्य केल्या.
ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी पाणी पिऊन उपोषण सोडले आणि अन्य ठिकाणचे आंदोलन थांबविण्याचे आवाहन केले.
उर्वरित दोन मागण्यांवर मंत्रिमंडळात चर्चा होणार असून शासन निर्णय एका महिन्यात काढण्याचे ठरले.
हैद्राबाद गॅझेटमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार असे आश्वासन ओबीसी विकासमंत्री अतुल सावे यांनी दिल्यानंतर बबनराव तायवाडे यांनी नागपूरमध्ये सुरु केलेले साखळी उपोषण सोडले आहे. ओबीसींच्या १२ मागण्याही मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अन्य ठिकाणी सुरु असलेले ओबीसी समाजाचे उपोषण थांबविण्याची सूचना दिली.