
भगवान खैरनार, मोखाडा: राज्यात महायुतीने पुन्हा सत्ता मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यानंतर तब्बल महिनाभरानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. मंत्र्यांचा शपथविधी होऊन आठ दिवस 39 मंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून राहावे लागले आहे. नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी खातेवाटप केले आहे. मात्र, पालकमंत्र्याचा तिढा कायम राहिला आहे.