पानी फाऊंडेशन हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला दुष्काळमुक्त करण्यासाठी महत्त्वाचा हातभार लावत आहे. महाराष्ट्राला संपन्न, समृद्ध करण्याच्या प्रयत्न पानी फाऊंडेशन सातत्याने काम करत आहे. याच फाऊंडेशनचा जागतिक स्तरावर सुद्धा गौरव होत आहे. पृथ्वीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या भारतातील पाच महत्वाच्या उपक्रमांची दखल घेतली आहे. यात पानी फाऊंडेशनचे कार्य प्रथम क्रमांकाचं असल्याचे अमेरिकेतील ओरेगॉन युनिव्हर्सिटीमधील सुप्रसिद्ध पर्माकल्चर प्रशिक्षक अँड्र्यू मिलिसन यांनी संकलन म्हटले आहे.
महाराष्ट्रात दुष्काळाने हजारो गाव ग्रासली आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी २०१६ मध्ये पानी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. या पानी फाऊंडेशननी या संकटाचा सामना करण्यासाठी एकत्रित चळवळ उभी केली, ज्याद्वारे ते लोकांना एकत्र आणतात, त्यांना प्रशिक्षण देतात आणि दुष्काळाविरुद्धच्या लढ्यात पुढाकार घेण्यासाठी प्रेरणा देतात.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त स्थिती दुर करण्यासाठी पानी फाऊंडेशनचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली आहे. पृथ्वीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रकल्पांच्या यादीत पानी फाऊंडेशन जगात अव्वल आहे.
दुष्काळ ही फक्त नैसर्गिक आपत्ती नाही, तर यासाठी माणसाचा निष्काळजीपणा तितकाच कारणीभूत आहे. सोबतच निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर झालेला ऱ्हास यामुळे महाराष्ट्राच्या वाटेला दुष्काळ आलेला आहे. नाम फाऊंडेशननी या दुष्काळाला थांबवण्यासाठी गावोगावी जाऊन विविध मोहीम राबवल्या आणि आजही राबवत आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भाग दुष्काळमुक्त झालेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.