

Devendra Fadnavis Poems
ESakal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत अनेक मोठ्या अर्थसंकल्पीय घोषणा केल्या. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना सुरू करण्याची घोषणा केली. "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना" सुरू करण्याची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या योजनेचा थेट फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होईल. मात्र सगळ्यातच त्यांच्या शेरोशायरी आणि कवितांची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांनी भाषणात काही कविता सादर केल्या. त्या चर्चेच्या अग्रस्थानी आल्या आहेत.