हे सरकार चोर-लुटारुंचे : प्रकाश आंबेडकर

हे सरकार चोर-लुटारुंचे : प्रकाश आंबेडकर

सांगली : हिंदूत्ववाद्यांना जे आपले पंतप्रधान वाटत होते. तेच आता चीनी अर्थव्यवस्थेला पोषण निर्णय घेत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा करून देशावर संकट आणले आहे. अशावेळी सारे हिंदुत्ववादी कुठे गेले आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मिरज येथे बोलताना केला. तसेच हे सरकार म्हणजे चोर-लुटारुंचे आहे, असेही ते म्हणाले.

नोटबंदीच्या निर्णयावर घणाघात करताना ते म्हणाले, "केवळ साठ टक्के पैसा सरळमार्गाने परत आला आहे. या नोटबंदीत तब्बल चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक पैसा काळ्याचा पांढरा झाला. तोच पैसा पुढच्या निवडणुकीत ओतला जाईल आणि त्या जीवावर सत्तेचे मनसुबे भाजप बांधत आहे. पुर्वीचे लुटारू होतेच, त्यात यांची भर पडली आहे. या लुटारुंच्या व्यवस्थेला किती दिवस पोसणार? या व्यवस्थेने राज्यातील कष्टकरी, बहुजन समाजाला विकासापासून, हक्कापासून वंचित ठेवले. ही व्यवस्था बदलण्यासठी बहुजन वंचित विकास आघाडी सज्ज झाली आहे''.

तसेच ते पुढे म्हणाले, ''महाराष्ट्रात केवळ 80 घराण्यांची सत्ता आहे. याच घराण्यांनी आपल्या बहुजनांचे वाटोळे केले. हे डोक्‍यावरचे संकट उधलून टाकू या. पेटीएम आणि एटीएमच्या माध्यमातून व्यवहार करून विरोधकांना पैसे देत आहोत. आपल्या पैशांतून आपल्यावर वार करत आहेत.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com