Loksabha 2019: प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार?

Loksabha 2019: प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार?

लोकसभा 2019: अकोला - वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी मुंबई येथे करण्यात येईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी सकाळी अकोला येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

गेले अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे कोणत्या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी मी सोलापूरतून निवडणूक लढावी, अशी इच्छा व्यक्त केली असल्याचे आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यानुसार आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र त्यांनी याला अधिकृत दुजोरा दिला नाही. याबाबत निर्णय घेण्यासाठी लक्ष्मण माने, अण्णाराव, अशोक सोनोने आदी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची आज (ता.11) रोजी बैठक होत आहे.

या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी अंतिम होईल. त्यानुसार मुंबईत घोषणा करण्यात येणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे आणि प्रदेश प्रवक्त राजेंद्र पातोडे यांची उपस्थिती होती.

अकोल्याचा पर्याय खुला
प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक सोलापुरातून लढण्याची शक्यता असला तरी अकोल्याचा पर्याय खुला ठेवला आहे. त्यांनी अकोल्यातून निवडणूक लढविणार नाही, या बाबत कोणतेही भाष्य पत्रकार परिषदेत केले नाही. याउलट एकापेक्षा अधिक जागेवरून निवडणूक लढविता येते, असे सांगून त्यांनी सोलापूरसोबतच अकोल्याचा पर्यायही खुला ठेवला आहे. 

माने, अण्णाराव म्हणजे मी नाही!
वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर हे सोलापुरातून निवडणूक लढतील, अशी इच्छा व्यक्त करून लक्ष्मण माने यांनी आंबेडकरांच्या उमदेवारीची घोषणा केली. याबाबत आंबेडकरांना विचारले असता माने, अण्णाराव म्हणजे मी नाही, असे सांगून त्यांनी वंचित आघाडीच्या नेत्यांतर्फे जाहीर करण्यात आलेल्या भूमिकेत कोणताही बदल होऊ शकतो, याचे संकेत दिले. 

हल्ल्याचे राजकारण करू नका
पुलवामा हल्ल्यानंतर शहिदांच्या कुटुंबियाची कुणालाही काळजी करावीशी वाटली नाही. उलट या हल्ल्याचे राजकारण केले जात आहे. काँग्रेसनेते मल्लीकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या काळात 12 एअरस्ट्राईक झाल्याचा दावा केला. त्यावर भाजप नेते राजनाथसिंह यांनी तीन एअरस्ट्राईक केल्याचा दावा केला. याबाबत या दोन्ही नेत्यांनी पुरावे द्यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com