Jitendra Awhad : प्रकाश आंबेडकरांना आव्हाडांची पत्रातून साद

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून मोर्चे बांधणी सुरु आहे.
prakash ambedkar jitendra awhad
prakash ambedkar jitendra awhadsakal

ठाणे - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून मोर्चे बांधणी सुरु आहे. दुसरीकडे वंचितच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात जावू नये असा, आवाहन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

त्यानंतर आता, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करुया अशी साद आव्हाड यांनी पत्राद्वारे आंबेडकरांना घातली आहे.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्यात महायुतीचे जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला असून भाजपकडून नुकतीच उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर झाली आहे. असे असताना, दुसरीकडे अजूनही महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे धोरण अद्याप जाहीर करण्यात आले नाही.

तर, दुसरीकडे महाविकास आघाडी सोबत जायचे किंवा नाही, याबाबत वंचितने आजही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे चित्रही अद्याप स्पष्ट होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आंबेडकरांचे मन वळविण्यासाठी आव्हाड मैदानात उतरले आहे. त्यांनी आंबेडकरांना भावनिक साद घातली आहे.

मी शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार - प्रसार व्हावा आणि जनमाणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्टÑवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तीक भुमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधार जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्वाचे नते म्हणून म्हणजेच आपल्याकडे पाहिले जात आहे.

तुमच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करतो की तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे. ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहिल, यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी वाटेल ती किमंत मोजायला मी तरी तयार आहे.

दरम्यान, आपणही याच विचारांचे आहात, संविधान आणि लोकशाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमुल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करुया असे आव्हाड यांनी त्या पत्रात नमुद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com