रोहा : तालुक्यातील निडी गावात घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने परिसर हादरला आहे. एका २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर २७ वर्षीय तरुणाने स्वतःहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे..प्राथमिक माहितीनुसार, दोघांमधील वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृत तरुणीचे नाव तन्वी गणेश ताडकर (वय २०) तर तरुणाचे नाव रोहित जनार्दन पाटील (२७) असे आहे. सोमवारी रात्री निडी येथील एका घरात दोघेही उपस्थित होते. या वेळी त्यांच्यात वाद झाल्यानंतर रोहितने तन्वीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केल्याचा आरोप . त्यानंतर त्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली..Mumbai-Goa Highway : चिपळूणकरांना मोठा दिलासा! मुंबई-गोवा हायवेवर यंदा पाणी तुंबणार नाही; प्रशासनानं उचललं 'हे' पाऊल, अपघाताच्या धोक्यांनाही 'ब्रेक'.मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घराचे मालक लक्ष्मण गडेकर यांचे निधन झाले असून घराची देखभाल तन्वीच्या आईकडे असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे..पत्नी-मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटकमाणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या महिला व दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी माणगाव पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. पती धर्मा जाधव हा पत्नी व चार मुलांचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मा जाधव हा पत्नी व मुलांना वारंवार मारहाण करून त्यांचा छळ करीत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी (ता. १२) पत्नीने चार मुलांना विषारी थंड पेय पाजल्यानंतर स्वतःही विषप्राशन केले होते. यात आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला. तर अन्य दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास करताना पोलिसांना पत्नी व मुलांवरील मानसिक आणि शारीरिक छळाची माहिती समोर आली. त्यानुसार धर्मा जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला..Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! शेवटची खोपोली लोकल दोन महिन्यांसाठी रद्द, आठवड्यातून तीन दिवस विशेष ब्लॉक.नालासोपाऱ्यात तरुणाचा चाकूने भोसकून खूनवनठापाडा परिसरात पार्टीवरून झालेल्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी (ता. १६) उघड झाली. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी एकाला अटक केली आहे. नितेश मिश्रा (वय २२) आणि करण कांबळे (वय ३०) यांच्या वाढदिवसाच्या पार्टीवरून हाणामारी झाली. संतापलेल्या करण कांबळेने चाकूने नितेशवर हल्ला केला. यामध्ये नितेश गंभीर जखमी झाला. नितेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पेल्हार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी करण कांबळे याला अटक केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.