Raigad Lok Sabah Election Latest News : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान सात मे रोजी होणार असून सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. दरम्यान गेल्या काही वर्षात मतदारसंघात कधीही फिरकलेले राजकारणी पुन्हा गाव-वाड्या-वस्त्यांवर हेलपाटे मारताना दिसत आहेत. यादरम्यान रायगड मतदारसंघातील काही गावांमध्ये जाऊन तेथील परिस्थिती तपासण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळे रायगड मतदारसंघातील काही आदीवासी पाडे शहरापासून काही किलोमिटर अंतरावर असून देखील अजूनही विकासापासून मात्र कोसो दूर असल्याचं पाहायला मिळाले.
रायगड लोकसभा मतदारसंघातील माणगाव तालुक्याला लागून असलेल्या आदिवासी पाड्यावरील लोकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत ही वस्तूस्थिती आहे. तालुक्यापासून फक्त १०० किलोमीटरवर असलेली ही वाडी असून सुविधांअभावी आदिवासी समाजातील नागरिकांमध्ये निराशा पाहायला मिळते. अदिवासी पाड्यावरील प्रश्न सकाळचे प्रतिनिधी संदिप कापडे यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
या गावातील बहुतांश आदिवासी कुटुंबे त्रस्त आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. नळपाणी योजनेंतर्गत काम झालं पण पाणी येत नाही. वाडीसमोर असलेले हातपंप बंद आहे. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाड्यात जायला रस्ता नाही. जंगली रस्ता आहे. शाळेत दोन किलोमीटर दुरु जावं लागतं. त्यामुळे येथील मुलांमध्ये शिक्षणाचा अभाव दिसून येतो.
तसेच येथील तरुणांना रोजगारासाठी महानगरात जावे लागते. स्वत:चं घर देखील या लोकांच्या नावावर नाही. त्यामुळे सरकारी योजना देखील मिळत नाहीत. लोकप्रतिनिधी येतात आश्वासन देतात अन् निवडून आले की परत कधीच येत नाहीत. आधी माशेमारी करायचो पण आता ते काम देखील करता येत नाही, अशी परिस्थिती आदिवास कुटुंबांनी बोलून दाखवली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.