

Farmers crop Loss Due To Rain:
ESakal
अलिबाग : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या मारा, सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेल्या भाताची नासाडी झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि भातकापणीच्या वेळेवरच पाऊस झाल्याने बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बळीराजा आपल्या शेतातील पीक वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.