Maharashtra Heavy Rain Alert
esakal
Heavy rains disrupt life in Maharashtra : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने राज्यात पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. नांदेड, हिंगोंली, धाराशिव, लातूर सोलापूरमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. आधीच पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं नुसकान झालं आहे. त्यात पुन्हा पाऊस सुरु असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.