

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. राज ठाकरे यांनी या मेळाव्यात भूमिका बदलल्याच्या आरोपांना जोरदार उत्तर दिलं. त्यांनी गेल्या ५० ते ६० वर्षांच्या इतिहासात राजकीय पक्ष आणि नेत्यांनी कशा आणि किती वेळा भूमिका बदलल्या हे सांगितलं. त्यांनी राजकीय पक्षांची आणि नेत्यांचीही उदाहरणे दिली. ज्यांना शिव्या घातल्या त्यांच्यासोबतच सत्तेत बसले असं म्हणत राज ठाकरेंनी टीकाही केली.