
मराठी भाषेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर आलेत. मराठी विजय मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी मराठी भाषेची गळचेपी, सरकारकडून हिंदी लादण्याचा होणारा प्रयत्न, नेत्यांचं शिक्षण यासह अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सन्माननिय उद्धव ठाकरे असं म्हणत सुरुवात केली. व्यासपीठावर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेच होते.