मुंबई- मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राज्य सरकारच्या अखत्यारित येत नाही. त्यासाठी केंद्रालाच कायदा करावा लागेल असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले होते. विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज ठाकरे यांनी याचा पुनरुच्चार केलाय. मराठा समाजाने जागृत राहावं. मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरु आहे, असं ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray On Maratha Reservation Bill targeted the government )
तमिळनाडूमध्ये असंच आरक्षण दिलं होतं. ते प्रकरण अद्यापही सुप्रीम कोर्टात सुरु आहे. मुळात याचा अधिकार राज्य सरकारला आहे का? हा प्रश्न आहे. ही गोष्ट केंद्राची आणि सुप्रीम कोर्टातील निर्णयाची आहे. मी मागे म्हटलं होतं की, हा खूप तांत्रिक विषय आहे. सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्याचं काही कारण नाही. १० टक्के आरक्षण दिलं म्हणजे नेमकं काय दिलं हे समाजाने विचारावं, असं राज ठाकरे म्हणाले.
सुप्रीम कोर्टात हे प्रकरण जाणार आहे. त्यानंतर सरकार म्हणणार हे प्रकरण आमच्या हातात नाही. कारण तो सुप्रीम कोर्टामध्ये आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरु आहे. अनेक राज्यांमध्ये हा विषय आहे. एखाद्या जातीसाठी असं करता येत नाही. त्यामुळे समाजाने या गोष्टींकडे पाहाणं महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.
राज्यासमोर मोठे प्रश्न असताना हे काय सुरु आहे हे मला कळत नाही. आज फेब्रुवारीमध्ये दुष्काळाचा, पाण्याचा प्रश्न मोठा आहे. निवडणुका, जातीपातीचे राजकारण, आरक्षण याकडे सगळ्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे. त्यामुळे महत्त्वाचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत, अशी आपली भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे.
मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर ते विधानपरिषदेमध्ये चर्चेसाठी ठेवले जाईल. विधानसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर विधेयक राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पाठवले जाईल. त्यांची स्वाक्षरी झाल्यास मराठा आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.