Raj Thackeray Panvel: कॉन्ट्रॅक्टर पळून जातात, हे मुंबई-गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं?; राज ठाकरेंना शंका

Raj Thackeray Panvel
Raj Thackeray Panvel

Raj Thackeray Panvel: राज ठाकरे यांनी मुंबई- गोवा महामार्गावरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे. या महामार्गासाठी मनसेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाला राज ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन यांच्याशी झालेला संवाद राज ठाकरे यांनी सांगितला.

राज ठाकरे म्हणाले, मुंबई गोवा महामार्गाबद्दल मी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींशी बोललो. गडकरी म्हणाले, मी लक्ष घातलं पण कंत्राटदार पळाले. काही लोक कोर्टात गेले आहेत. यामागे काय कारण आहे?. मुख्यमंत्री म्हणतात, महामार्ग पूर्ण होईल पण मृत्यूमुखी पडलेल्यांच कायं? अडीच हजार लोक गेली त्यांच काय? अपघात होतात… टायर फुटतात… पण सगळ काही ढीम्म.

मुंबई गोवा महामार्गावर आजपर्यंत २५०० लोकं मृत्यूमुखी पडलेत. अनेकांना दुखणी लागली आहेत, गाड्यांचं नुकसान झालं आहे. तरीही त्याच लोकांना निवडून देत आहेत. त्यामुळे हे पुन्हा पुन्हा निवडून येणारे निवांत आहेत. ते टेंडर, टक्केवारीत व्यस्त आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.  

आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५६६६ कोटी रुपये आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या. मी नितीनजींना विनंती केली होती की जर राज्य सरकारला जमत नसेल तर तुम्ही बघा, तर ते म्हणाले की अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. (latest marathi news)

Raj Thackeray Panvel
NCP Sharad Pawar : "येउद्या कितीही कष्ट, पाठीशी आहे महाराष्ट्र" शरद पवारांच्या स्वाभिमान सभेचा Teaser Release

राज ठाकरे म्हणाले, २०२४ ला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आता सरकार सांगतंय. चांगलंच आहे, हे व्हायलाच हवं. पण पुढे काय? मुंबई-पुणे रस्ता झाला, आणि पुणे पसरत गेलं. घडलं काय तर पुण्याची पार वाट लागली. पुण्यात मराठी माणूस हा आक्रसत चालला आहे. हेच कोकणात होणार आहे.

गोव्यात २०२३ चा कायदा आहे की तुम्हाला सहज शेतजमीन घेता येणार नाही. आणि जर घेतली तर तिकडे शेतीच करावी लागली, तिथे इतर उद्योग, हॉटेलं उभारता येणार नाही. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गोव्याचा आम्ही गुरुग्राम होऊ देणार नाही, थोडक्यात उत्तर भारतीयांना जमिनी घेऊन गोव्याची वाट लावू देणार नाही. आणि हे बोलणारा कोण तर भाजपचा मुख्यमंत्री, असे राज ठाकरे म्हणाले.  

Raj Thackeray Panvel
Raj Thackeray Panvel: भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला शिकावं; टोल प्रकरणावर राज ठाकरेंचा पलटवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com