राज्यात का वाजत आहेत 'भोंगे'? राजू शेट्टींनी सांगितलं कारण

Raju Shetty
Raju Shettyesakal
Summary

'शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार अपयशी ठरलं आहे.'

कऱ्हाड (सातारा) : महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकार (Central Government) तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार यांचं अपयश यावर चर्चा नको, म्हणून हे राजकीय भोंगे वाजत आहेत, असं स्पष्ट मत माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आज (कऱ्हाड) व्यक्त केलं.

बळीराजा उध्दार यात्रेनिमित्त राजू शेट्टी शनिवारी कऱ्हाडला (जि. सातारा) आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी स्वाभिमानीचे सचिव राजेंद्र गड्डेनवार, जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, प्रमोद जगदाळे, रामचंद्र साळुंखे आदी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकार तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार (Maharashtra Government) अपयशी ठरलं आहे. शेतकऱ्यांवर गेल्या दोन वर्षात महापूर, कोरोनासह अनेक आपत्ती आल्या. त्यामध्ये पीक विमा योजना राबवणाऱ्या कंपन्या कर्जबाजारी होवून दिवाळखोरीत निघाल्या पाहिजे होत्या.

Raju Shetty
शरद पवारांबरोबर मतभेद, मात्र ते जातीयवादी नाहीत : राजू शेट्टी

मात्र, त्याच कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांचा नफा कमवला आहे. त्यामुळं त्यांनी शेतकऱ्यांना फसवलंय. केंद्र सरकार, राज्य सरकार यांचं अपयश यावर चर्चा नको म्हणून हे राजकीय भोंगे वाजत आहेत, असं स्पष्ट मत शेट्टींनी यावेळी व्यक्त केलं. दरम्यान, त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com