Raju Shetty : सरकार आणि कारखानदारांनी घेतला शेतकऱ्यांचा बळी

राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून जवळपास सहा महिने झाले. तरीही गेल्यावर्षीच्या ऊसाचा एफआरपीप्रमाणे हिशोब पूर्ण न करता अंतिम देयके निश्चीत करण्यात आली आहे.
Raju Shetty
Raju ShettySakal

पुणे - राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून जवळपास सहा महिने झाले. तरीही गेल्यावर्षीच्या ऊसाचा एफआरपीप्रमाणे हिशोब पूर्ण न करता अंतिम देयके निश्चीत करण्यात आली आहे. सरकार व कारखानदार दोघेही संगनमताने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बळी घेत आहे, असे घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर केला.

राज्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन ४०० रुपये दुसरा हप्ता दिल्याशिवाय कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नवी पेठेतील श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. टनाला एफआरपी पेक्षा ४०० रुपये अधिक द्यावेत अशी मागणी राजू शेट्टींनी शासनाला केली आहे. त्यासाठी २ ऑक्टोबर पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला असून, या मागणीची पुर्तता न झाल्यास एकाही साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असेही शेट्टींनी नमूद केले आहे.

यासंबंधी त्यांनी साखर आयुक्त चंद्रकांत पुलकंडवार यांनाही निवेदन दिले आहे. शेट्टी म्हणाले, ‘साखरेसह व उपपदार्थांना बाजारात चांगला भाव मिळू लागला आहेत. यामुळे देशामध्ये साखर उद्योग तेजीत आहे. राज्य सरकार व साखर कारखानदार हे दोघेही संगनमताने मिलीभगत करून शेतकऱ्यांना साखरेच्या व उपपदार्थाच्या हिशोबात फसवणूक करत आहेत.’

साखरेबरोबरच शेतीसंबंधीच्या अनेक विषयांना शेट्टी यांनी स्पर्ष केला. राज्यात पावसाने दडी मारली असून सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com